या काळ्या इंग्रजांपासून तुम्हाला देशाला मुक्त करायचे आहे – सिद्धू


नवी दिल्ली – मौलाना आझाद आणि महात्मा गांधींचा काँग्रेस पक्ष असून गोऱ्या लोकांपासून त्यांनी तुम्हाला स्वातंत्र्य मिळवून दिले. पण तुम्हाला आता देशाला काळ्या इंग्रजांपासून मुक्त करायचे असल्याचे म्हणत काँग्रेस नेते नवज्योतसिंह सिद्धू यांनी भाजपवर टीका केली.

देशाला ५ गांधी काँग्रेसने दिले. पण देशाला भाजपने फक्त भगोडे लोक दिलेले आहेत. पहिला नीरव मोदी, दुसरा ललित मोदी आणि तिसरा नरेंद्र मोदी, असे सिद्धू म्हणाले. पंतप्रधान मोदींवर खोटारडेपणाचे आरोप वाढतच चालले आहे. त्यांनी फक्त आणि फक्त अंबानींसाठी काम केले आहे. त्याचा फायदा आज चीनला होत आहे. मी चौकीदार आहे, असे मोदी म्हणतात. पण अंबानींच्या दारासमोर चौकीदार तर उभा राहतो. गरिबांच्या नाही, अशीही टीका त्यांनी यावेळी केली.

Leave a Comment