राजीव गांधींनी आयएनएस विराटचा फिरण्यासाठी केला वापर – मोदी


नवी दिल्ली – पंतप्रधान असताना राजीव गांधी यांनी आयएनएस विराट युध्दनौका ही आपल्या नातेवाईकांसोबत सुट्टी घालवण्यासाठी वापरत होते. आयएनएस विराट युध्दनौकेचा गांधी कुटुंबियांनी आपल्या खासगी वापरासाठी केल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. त्यांनी दिल्ली येथील रामलीला मैदानावर आयोजीत प्रचार सभेत पुन्हा एकदा गांधी कुटुंबियांवर जोरदार हल्लाबोल केला.

१० दिवस सुट्टी घालवण्यासाठी राजीव गांधी हे कुटुंबियांसोबत गेले होते. त्यांनी त्यावेळी आयएनएस विराट या युध्दनौकेचा वापर कुटुंबियांना फिरवण्यासाठी केला. गांधी कुटुंबियांना घेऊन आयएनएस विराट ही युध्दनौका एक बेटावर १० थांबली होती. ज्या बेटावर गांधी कुटुंब गेले होते. तिथे त्यांची सेवा करण्याचे काम लष्कर व सरकारने केले होते. विशेष हेलिकॉप्टरसुध्दा यासाठी वापरण्यात आले होते. याचे नियोजन प्रशासनानेच केले होते. जेव्हा एक कुटुंब सर्वोच्च होते, तेंव्हा देशाची सुरक्षा धोक्यावर येते, असेही मोदी म्हणाले.

Leave a Comment