राज ठाकरेंबाबत राणेंच्या आत्मचरित्रात दोन खळबळजनक गौप्यस्फोट


मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी ‘No Hold Barred : My Years in Politics’ नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे. नारायण राणेंनी या आत्मचरित्रातून वादळी खुलासे केले आहेत.

2005 मध्ये शिवसेनेला नारायण राणे यांनी रामराम ठोकला, तर 2006 मध्ये राज ठाकरे यांनी जय महाराष्ट्र केला. राज ठाकरे आणि नारायण राणे यांच्या मैत्रीबद्दल या दरम्यान नेहमीच बोलले जायचे. आपल्या आत्मचरित्रात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दलही राणेंनी खळबळजनक गौप्यस्फोट केले आहेत.

राज ठाकरे यांनी 2006 साली शिवसेनाला शिवसेनेतील अंतर्गत राजकारणाला कंटाळून ‘जय महाराष्ट्र’ केला. राज ठाकरे यांनी महाराष्ट्रभर दौरा करुन, ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ नावाचा पक्ष स्थापन केला. शिवसेना राज ठाकरे यांनी सोडणे, ही महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत मोठी घटना होती. याचे कारण बाळासाहेब ठाकरे यांचे राज ठाकरे हे अत्यंत जवळचे व्यक्ती होतेच, पण त्यांच्याकडे ‘ठाकरे शैली’चे खरे वारसदार म्हणूनही पाहिले जात होते.

दुसरीकडे शिवसेना सोडण्याआधीच राज ठाकरे यांनी शिवसेनेतील अत्यंत आक्रमक नेते नारायण राणे यांनी शिवसेना सोडली होती. पक्षातील मान-सन्मान आणि पदांवरुन नारायण राणे यांचा वाद होता. पण ज्यावेळी शिवसेना राज ठाकरे यांनी सोडली, त्यावेळी नारायण राणे यांच्याशी त्यांनी संपर्क साधला होता.

राज ठाकरेंनी त्यावेळी आपल्याला आपण एकत्र येऊन नवीन पक्ष स्थापन करु, असे निमंत्रण दिले होते, असा खळबळजनक गौप्यस्फोट नारायण राणे यांनी आत्मचरित्रात केला आहे. पण नारायण राणेंनी राज ठाकरेंचे निमंत्रण नाकारले. ठाकरेंच्या कामाची पद्धत माहित असल्याने, त्यांच्यासोबत काम करणार नाही, असे नारायण राणेंनी राज ठाकरेंना कळवले.

2006 साली राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली, शिवसेनेतील बाळा नांदगावकर, शिशीर शिंदे, प्रवीण दरेकर यांच्यासह अनेक महत्त्वाचे नेते त्यावेळी त्यांच्यासोबत आले. राज ठाकरे यांनी शिवेसना सोडण्याआधी राज्यभर दौरा करुन, आपल्याला प्रतिसाद कसा मिळेल, याचा अंदाज घेतला होता. याच अनुशंघाने नारायण राणे यांनी त्यांच्या आत्मचरित्रात राज ठाकरेंबद्दल दुसरा गौप्यस्फोट केला आहे. शिवसेनेतील जवळपास 38 आमदार राज ठाकरेंसोबत होते. राज ठाकरेंनी शिवसेना सोडली, त्यावेळी हे 38 आमदारही पक्ष सोडणार होते. पण प्रत्यक्षात 13 आमदारांनी पक्ष सोडला, असे नारायण राणेंनी आत्मचरित्रात म्हटले आहे.

Leave a Comment