तेज बहादुर यादव यांना सर्वोच्च न्यायालयाचा तात्पुरता दिलासा


नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने आज निवडणूक आयोगाला तेज बहादुर यादव यांच्या अर्जावर पुर्नविचार करावा, त्याचबरोबर न्यायालयाला त्यासंदर्भात उद्यापर्यंत माहिती द्यावी, असे आदेश दिले आहेत. अपक्ष म्हणून वाराणसीमधून पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात यादव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पण कोणत्या कारणामुळे त्यांना सैन्यातून काढले? याबाबतचे प्रमाणपत्र ते सादर करू न शकल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज आयोगाने नाकारला होता.

यासंदर्भात मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई आणि न्यायाधीश दीपक गुप्ता यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी निवडणूक आयोगाने यादव यांच्या अर्जाची पडताळणी करून त्यावर उद्यापर्यंत न्यायालयाला माहिती द्यावी, असे आदेश दिले आले आहेत.

सैन्यातून तेज बहादुर यांना बडतर्फ केले असून त्यांना भ्रष्टाचार किंवा अप्रामाणिकतेमुळे काढलेले नाही, तर त्यांनी वाईट जेवणामुळे तक्रार केली होती. त्यामुळे त्यांना त्यांना सैन्यातून काढण्यात आले आहे. तरीही निवडणूक आयोगाकडून त्यांना भ्रष्टाचार किंवा अप्रामाणिकतेमुळे काढले नसल्याचा अर्ज दाखल करण्याचा आग्रह धरला जात असल्यामुळे या प्रकरणाकडे विशेष लक्ष देऊन सर्वोच्च न्यायालयाने उद्यापर्यंत माहिती सादर करण्याचे आदेश दिले असल्याचे त्यांचे वकील प्रशांत भूषण यांनी माध्यमांना सांगितले.

Leave a Comment