राणेंनी आत्मचरित्रातून केलेल्या आरोपांचे मनोहर जोशींकडून खंडन


मुंबई : माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींनी नारायण राणेंनी आत्मचरित्रातून केलेल्या आरोपांचे खंडन केले आहे. बाळासाहेबांनी फोन करुन बोलवणे आणि उद्धव ठाकरेंनी दिलेली धमकी असे जे आरोप नारायण राणेंनी आपल्या आत्मचरित्रात केले आहेत त्यात तथ्य नसून मी पहिल्यांदाच या गोष्टी ऐकत असल्याचे शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी सांगितले.

शिवसेनेची आज वाईट अवस्था जोशींच्या वागणुकीमुळे झाल्याचा आरोपही राणेंनी केला होता. या सर्व आरोपांचे खंडन करत मनोहर जोशींनी नारायण राणेंवरच टीकास्त्र सोडले आहे. तसेच चांगले शिक्षण महत्वाचे आहे, काही लोक शिक्षित नाही असा टोलाही राणेंना लगावला. उद्धव ठाकरेंच्या मनोहर जोशी हे जवळचे होते. उद्धव ठाकरेंनी राणेंना मनोहर जोशींनी कान भरल्यानंतर डावलून सुभाष देसाईंना विरोधी पक्ष नेते पद दिल्याचा दावा देखील राणेंनी पुस्तकात केला होता. मनोहर जोशींनी या आरोपाचे देखील खंडन केले आहे.

Leave a Comment