शिवसेना सोडण्यामागचे कारण नारायण राणे आत्मचरित्रातून उलगडणार


मुंबई – शिवसेना सोडण्यामागचे कारण आपण आत्मचरित्रातून उलगडणार असल्याचे खासदार नारायण राणे यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर अनेक गुपितांवर आत्मचरित्रातून प्रकाश टाकला जाईल असेही त्यांनी म्हटले आहे. नारायण राणे यांचे आत्मचरित्र लिहून तयार असून लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्याचे प्रकाशन केले जाणार आहे. आपल्या आत्मचरित्रातून शिवसेना सोडण्यामागचे खरे कारण समोर येईलच असे नारायण राणे यांनी म्हटले आहे. त्यांनी ही माहिती एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दिली.

माझे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी वैयक्तिक कोणतेही मतभेद नाहीत. त्यांच्याशी माझे वैचारिक मतभेद आहेत. लोकांना उद्धव ठाकरेंनी कसा त्रास दिला तेदेखील आपण आपल्या आत्मचरित्रात लिहिले आहे असेही नारायण राणेंनी म्हटले आहे. तसेच शिवसेना, काँग्रेस आणि भाजप या सगळ्या पक्षांमधल्या प्रवासाबाबत माझ्या आत्मचरित्रात मी लिहिले असल्याचेही राणे यांनी स्पष्ट केले.

राणे यांनी यावेळी भाजप प्रवेशाची सगळी कारण समोर येतील असं सांगतानाच चंद्रकांत खैरे यांनी युतीचा धर्म कुठे पाळला असाही प्रश्न उपस्थित केला आहे. दरम्यान २४ एप्रिल रोजी एक ट्विट नितेश राणे यांनी केले होते. नारायण राणे आत्मचरित्र लिहित आहेत असे त्यांनी ज्यामध्ये नमूद केले होते.

Leave a Comment