आयपीएलच्या प्ले ऑफ, अंतिम सामन्याच्या वेळा बीसीसीआयने बदलल्या


नवी दिल्ली – बीसीसीआयकडून इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) प्ले ऑफ व अंतिम सामन्यांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. हे सामने यापूर्वी रात्री ८ वाजता होणार होते, पण हे सामने आता संध्याकाळी ७:३० वाजता खेळवण्यात येणार आहेत. आयपीएलच्या बाराव्या मोसमातील ‘प्ले-ऑफ’ फेरीतील Qualifier-१ हा सामना चेन्नईत ७ मे रोजी खेळला जाईल. तर Eliminator सामना ८ मे रोजी आणि Qualifier-२ सामना १० मे रोजी विशाखापट्टणम येथे खेळवला जाणार आहे.

१२ मे रोजी हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर आयपीएलचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. हे सर्व सामने यापूर्वीच्या वेळापत्रकानुसार रात्री ८ वाजता खेळवण्यात येणार होते. पण हे सामने आता अर्धा तास लवकर म्हणजेच, सायंकाळी ७:३० वाजता खेळवण्यात येतील.

Leave a Comment