राहुल गांधींनी आपल्या नागरिकत्वाचा पंधरा दिवसांत खुलासा करावा


नवी दिल्ली : केंद्रीय गृह मंत्रालयाकडून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी नोटीस पाठविण्यात आली असून आहे. भाजप नेते आणि खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्रीय गृह मंत्रालयाकडे राहुल गांधी यांच्या नागरिकत्त्वाबाबत तक्रार दाखल केली होती. केंद्रीय गृह मंत्रालयाकडून यावर राहुल गांधी यांना नोटीस पाठविण्यात आला असून येत्या पंधरा दिवसांत उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले आहे.

राहुल गांधी यांनी ब्रिटनचे नागरिकत्व घेतल्याचा दावा करत त्यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी, अशी तक्रार याआधी अमेठी लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार ध्रुव लाल यांचे वकील रवी प्रकाश यांनी रिटर्निंग अधिकाऱ्यांकडे केली होती. पण राहुल गांधी यांचा उमेदवारी अर्ज यावेळी वैध ठरविण्यात आला होता. रवी प्रकाश यांनी हा दावा ब्रिटनमधील रजिस्ट्रेशन असलेल्या एका कंपनीच्या कागदपत्रांच्या आधारे केला होता. याच बरोबरच त्यांनी राहुल गांधी यांच्या शैक्षणिक पात्रतेबाबतही आरोप केले होते.

भारतीय जनता पक्षाने (भाजप) या मुद्द्यावर कांग्रेस पक्षाकडे स्पष्टीकरण मागितले होते. तसेच, भाजप नेते आणि खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी याप्रकरणी केंद्रीय गृह मंत्रालयाकडे तक्रार दाखल केली होती. केंद्रीय गृह मंत्रालयाकडून यावर राहुल गांधी यांना नोटीस पाठविण्यात आली असून येत्या पंधरा दिवसांत उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले आहे.

Leave a Comment