मतदारयादीत मृत वडिलांचे नाव पाहून संतापले जितेंद्र आव्हाड


मुंबई : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी निवडणूक आयोग हा देशावर लागलेला कलंक असल्याचे वक्तव्य केले आहे. त्यांनी हा संताप आपल्या मृत वडिलांचे नाव मतदारयादीत असल्याने आणि अनेक लोकांची नावं मतदारयादीतून गहाळ झाल्याने व्यक्त केला.

आव्हाड पुढे म्हणाले की, देशावर लागलेले निवडणूक आयोग हे कलंक आहे. अतिशय वाईट काम सुरू आहे. 2 वर्षांपूर्वी माझे वडील वारले. अजून मतदारयादीत त्यांचे नाव आहे. दुसरीकडे जिवंत आहेत त्यांची नावे अजून सापडत नसल्याचे ते म्हणाले. संपूर्ण प्रक्रिया ही डिजिटल करून व्यवस्था सुधारायला हवी, असेही ते यावेळी म्हणाले.

शिवसेनेचे आमदार रवींद्र फाटक यांना तात्काळ अटक का करण्यात आली नाही? त्यांना सोडलेच कसे?, असा सवालही यावेळी त्यांनी केला. या पोलीस प्रशासनावर या सरकारचा प्रचंड दबाव असल्यामुळे असे प्रसंग घडत असल्याचेही ते म्हणाले.

बविआने आमदार रवींद्र फाटक यांच्या गाडीत रोकड असल्याची तक्रार करत जवळपास तीन तास फाटक यांची गाडी अडवून धरत बॅग तपासणीची मागणी केली होती. यामुळे राञी एक ते तीन वाजेपर्यंत नालासापोरा पूर्वेकडे तणावाचे वातावरण होते.

Leave a Comment