साध्वी प्रज्ञासिंह यांचे तोंड काळे करणाऱ्या गावाला करणार सन्मानित भीम आर्मी

sadhavi-pragya1
मुंबई : लोकसभा निवडणुकीत गावबंदी करून देशासाठी आपले प्राण गमावणारे पोलीस अधिकारी शहीद हेमंत करकरे यांचा अवमान करणाऱ्या मालेगाव बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी व साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचे तोंड काळे करणाऱ्या गावांचा महाराष्ट्र भीम आर्मीच्या वतीने पुरस्कार देऊन गौरव करणार असल्याची घोषणा आर्मीचे महाराष्ट्र प्रमुख अशोक कांबळे यांनी केली आहे. भाजपने प्रज्ञासिंह यांना लोकसभेची उमेदवारी देऊन देशातील शहीदांचा अवमान केला असल्याची टीका महाराष्ट्र भीम आर्मीने केली आहे.

हेमंत करकरे यांची हत्या आपण श्राप दिल्यामुळेच झाली, असे संतापजनक वक्तव्य प्रज्ञासिंह यांनी केले होते. त्यांनी 26/11 हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाब याची भलावण केली होती. प्रज्ञासिंह यांनी शहीद हेमंत करकरे यांच्यासह देशासाठी शहीद झालेल्या शहीद वीर जवांनांचाही अपमान करून देशविरोधी मानसिकता स्पष्ट केली आहे. असे असताना देशप्रेमाचा बागुलबुवा उभा करणाऱ्या भाजपने त्यांना भोपाळ लोकसभा मतदारसंघातून तिकीट देण्याचा घाट घातला आहे. भाजपच्या या कृतीवरून त्यांचे देशप्रेम किती बेगडी आहे हे त्यांनी त्यांच्याच कृतीतून दाखवून दिलेले आहे, अशी टीका कांबळे यांनी केली.

शहीदांच्या नावाने देशभर पंतप्रधान नरेंद्र मोदी मतांचा जोगवा मागत असतानाच शहीदांचा अवमान करणाऱ्या व एका आरोपीला लोकसभेचे तिकीट देऊन आपल्या देशभक्तीचे त्यांचाच पक्ष प्रमाण देत आहे. देशभरातून त्यांच्या या कृतीचा विरोध होत असला तरी भाजप प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे तिकीट कायम करीत असेल तर भोपाळमधील देशप्रेमी जनता प्रचारासाठी फिरणाऱ्या प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे तोडे काळे करावे. तसेच चप्पलाचा हार घालून गाढवावर फिरवणे अशा वेगळ्या प्रकारे सत्कार केल्याशिवाय राहणार नाही. अशा गावांना महाराष्ट्र भीम आर्मीच्या वतीने देशभक्त गाव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येईल असे कांबळे यांनी सांगितले.

Leave a Comment