राज ठाकरेंच्या भाषणाचे धनंजय मुंडेंकडून कौतुक

dhananjay-munde
बीड – राज्यातील वेगवेगळ्या भागात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सभा होत असल्यामुळे 8 ते 10 टक्के मतदारांममध्ये प्रभाव जाणवेल. कारण, व्हिडिओच्या माध्यमातून जे भाषण राज ठाकरे करत आहेत ते म्हणजे, हा सूर्य आणि हा जयद्रथ असेच असल्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी म्हटले आहे.

तर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या व्हिडिओ भाषणाबाजीला शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी कस-पेस्टचे राजकारण म्हटले आहे. आम्ही पॉझिटीव्ह गोष्टी राज ठाकरेंना दाखवतो, आमच्यासोबत त्यांनी त्यांचा माणूस पाठवावा, म्हणजे डिजीटल गावची दुसरी बाजू त्यांना दिसेल. तर, कट पेस्टचे राजकारण राज ठाकरेंनी सोडावे, सलग ठोस भूमिका घ्यावी, असा सल्लाही विनोद तावडेंनी राज ठाकरेंना दिला आहे.

दुसरीकडे राज ठाकरेंच्या भाषणाचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी कौतुक केले आहे. राज ठाकरेंच्या भाषणामुळे नक्कीच फरक पडेल. 8 ते 10 टक्के मतदार त्यांच्या भाषणामुळे प्रभावित होतील. कारण, राज ठाकरेंचे भाषण हे हा सूर्य आणि हा जयद्रथ असे असल्याचे मुंडेंनी म्हटले आहे. दरम्यान, आज सकाळीच बीड मतदारसंघातील आपल्या मतदान केंद्रावर जाऊन धनंजय मुंडेंनी मतदान केल्यानंतर, प्रसारमाध्यमांशी बोलताना मुंडेंनी राज ठाकरेंच्या भाषणाबाबत आपले मत मांडले.

Leave a Comment