काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या हे काय बोलून गेल्या आपल्याच पक्षाबद्दल

priyanka-chaturvedi
नवी दिल्ली – काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी या उत्तर प्रदेशातील काही नेत्यांना पुन्हा पक्षात स्थान दिल्यामुळे नाराज झाल्या असून एक संदेश टि्वट करुन त्यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे. उत्तर प्रदेशातील काँग्रेस नेत्यांवर मथुरेमध्ये प्रियंका चतुर्वेदींबरोबर काही महिन्यांपूर्वी गैरवर्तन केल्यामुळे शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली होती. पण त्यांना आता पुन्हा सामावून घेण्यात आले आहे.

प्रियंका चतुर्वेदी यांनी त्यावर जाहीर नाराजी व्यक्त केली. पक्षासाठी ज्यांनी रक्त आटवले, घाम गाळला त्यांच्याऐवजी काँग्रेसमध्ये गुंडांना प्राधान्य दिले जात असून पक्षासाठी मी दगड खाल्ले, अपशब्द ऐकले पण ज्यांनी मला पक्षामध्येच धमकावले. कुठलीही कारवाई त्यांच्यावर होणार नसेल तर ते दुर्देव म्हणावे लागेल असे प्रियंका चतुर्वेदी यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे. एक टि्वट त्यांनी रिटि्वट करुन हा संदेश लिहिला आहे.

जो मजकूर या पत्रामध्ये आहे त्यानुसार पक्षातील त्या नेत्यांचे प्रियंका चतुर्वेदीच्या तक्रारीवरुन निलंबन करण्यात आले होते. पण ज्योतिरादित्य सिंधियांच्या हस्तक्षेपानंतर आता त्या नेत्यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. काँग्रेसचे सिंधिया सरचिटणीस असून उत्तर प्रदेशची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. प्रियंका चतुर्वेदींची मथुरेमध्ये राफेल डील संबंधी पत्रकार परिषद झाली होती. त्यावेळी त्यांच्या बरोबर गैरवर्तनाचा हा प्रकार घडला होता.

Leave a Comment