ते विधेयक आणण्याचा प्रयत्न केला तर मोदींसमोरच आत्महत्या करेन

MLA
शिलाँग – नागरिकता संशोधन विधेयक (सिटिजनशिप अमेंडमेंट बिल) आणण्यासाठी मोदी सरकार प्रयत्न करत असतानाच या विरोधात त्यांच्याच पक्षातील उमेदवार आवाज उठवत आहेत. मी जिवंत असेपर्यंत नागरिकता संशोधन विधेयक आणले जाणार नाही, असे वक्तव्य मेघालयातील शिलाँगचे भाजपचे उमेदवार सनबोर शुल्लई यांनी केले आहे.

शुल्लई म्हणाले, माझा या विधेयकाला विरोध असून जर कोणी हे विधेयक आणण्याचा प्रयत्न केला तर नरेंद्र मोदी यांच्या समोर मी आत्महत्या करेन, पण हे विधेयक आणू देणार नाही. सरकारचा ईशान्य भारतात सिटिजनशिप अमेंडमेंट बिल आणण्याचा विचार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी काही दिवसापुर्वी आसाम दौऱ्यावर गेले होते. मोदी यांनी या दौऱ्यात विरोधकांवर सिटिजनशिप अमेंडमेंट बिलविषयी चुकीची माहिती पसरवत असल्याचा आरोप केला होता.

Leave a Comment