जयपूर – जयपूरच्या सवाई मानसिंग मैदानावर गुरूवारी खेळल्या गेलेल्या राजस्थान आणि चेन्नईविरूद्धच्या सामन्यात शेवटच्या चेंडूवर षटकार खेचत चेन्नईने ४ गडी राखत थरारक विजय मिळवला. कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या मैदानावरील त्या कृत्याची चेन्नईच्या या रोमहर्षक विजयापेक्षा चर्चा झाली.
When MS Dhoni lost his cool
Boss….. pic.twitter.com/v4wJ7r98pf— Shakti Solanki (@shaktisolanki00) April 12, 2019
चेन्नईला या सामन्यात अखेरच्या षटकात विजयासाठी 18 धावांची गरज होती. बेन स्टोक्सने या षटकात टाकलेला चौथा चेंडू पंचांनी ‘नो बॉल’ न दिल्याने, संतापलेला चेन्नईचा कर्णधार धोनी चक्क सामना चालू असताना डग आउटमधून मैदानात येत पंचांना जाब विचारु लागला. नेहमी कॅप्टन ‘कुल’ म्हणून ओळखला जाणारा धोनीचे हे ‘अँग्री’ रूप सर्वानाच आश्चर्य चकित करणारे होते.
आयपीएलने सामना संपल्यानंतर नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत धोनीवर कारवाई केली आहे. धोनीवर कारवाई म्हणून सामन्यातील ५० टक्के मानधनाचा दंड आयपीएलकडून करण्यात आला आहे. पूर्ण क्रिकेट वर्तुळात धोनीच्या या अश्या वागण्याची चर्चा होत आहे. काहींनी पंचांना दोषी धरत धोनीचे समर्थन केले तर काहींनी धोनीचे हे वागणे खूप चुकीचे असल्याचे म्हटले आहे. सामना चालू असताना मैदानात येणे हे नियमबाह्य असल्याने धोनीचे चुकीचेच आहे. खेळाडूपेक्षा खेळ आणि त्याचे नियम कधीही मोठे असतात, कधीही नियम तोडणे हे चुकीचेच असल्यामुळे धोनी हा चुकलाच असे अनेक क्रिकेटप्रेमी तसेच दिग्गज खेळाडू सांगत आहेत.