म्हणून पायात घालायचे पैंजण


महिला मुलींच्या पायात चांदीचे पैंजण घालणे हा आपल्या परंपरागत सोळा श्रुंगाराचा एक भाग प्राचीन काळापासून मनाला गेला आहे. मात्र या मागे नुसते पायाचे सौंदर्य वाढविणे हा हेतू नाही तर महिलांचे आरोग्य चांगले राहावे या त्यामागचा मूळ हेतू आहे. पैंजण घालण्यामागे पैंजणाच्या आवाजामुळे घरातील नकारात्मक उर्जा बाहेर जाते असे धार्मिक कारण दिले जाते मात्र त्यामागे वैज्ञानिक कारणही आहे.

चांदी आणि सोने या धातूंचा वापर आरोग्यासाठी फार प्राचीन काळापासून केला जात आहे. चांदीच्या वापरामुळे महिलांच्या हार्मोन बदलामुळे येणाऱ्या अनेक अडचणी दूर होतात. चांदीचे पैंजण पायात घातले कि चांदी पायाच्या त्वचेवर घासली जाते आणि त्यातून या धातूचे गुण शरीरात जातात. पायावर येणारी सूज, गुडघे दुखी, टाचा दुखी आणि हिस्टेरिया सारख्या व्याधीतून यामुळे आराम मिळतो.

चांदीच्या वापरामुळे शरीरात रक्तप्रवास सुरळीत राहतो, सूज कमी होते, शरीरातील उर्जा वाढते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते. शरीरातील ग्रंथी सक्रीय राहतात. आणि स्त्रीरोग संबंधी अडचणी दूर होतात. प्रसूती दरम्यात येणाऱ्या अडचणी दूर होतात तसेच पाय दुखणे. मुंग्या येणे. पायातील शक्ती कमी होणे या सारख्या व्याधीमधेही चांदीचे पैंजण घालण्याने फायदा होतो.

Leave a Comment