निवडणुक आयोगाचा चौकीदारांवर सर्जिकल स्ट्राईक

namo-tv
मुंबई – केंद्रीय निवडणूक आयोगाने देशात आचारसंहिता लागू झाल्यापासून सुरू केलेली कारवाई भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी डोकेदुखी ठरत आहे. निवडणूक आयोगाने वारंवार होणाऱ्या आचारसंहिता भंगामुळे वेगवेगळ्या प्रकरणी नोटीस देऊन उत्तर मागवले आहे. दूरदर्शनवर मोदींनी केलेले भाषण असो किंवा भाजपचा नमो टीव्हीवर होणारा सर्रास प्रचार असो.

भाजपकडून वेळोवेळी आचारसंहिता लोकसभा निवडणुक आचारसंहिता लागू झाल्यापासून भंग करण्यात येत असल्याचे आरोप विरोधकांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “मै भी चौकीदार” या मोहिमेसाठी दूरदर्शनवर ३१ मार्च रोजी दीड तास भाषण केल्यानंतर करण्यात आलेल्या तक्रारीनंतर निवडणुक आयोगाने आचारसंहिता भंग झाल्याचे ठपका ठेवला आहे. त्यामुळे भाजपची “मै भी चौकीदार” मोहीम अडचणीत आली आहे. हा व्हिडिओ सोशल मिडियावर निवडणुक आयोगाची परवानगी न घेताच टाकण्यात आला होता. निवडणुक आयोगाने व्हिडिओमध्ये जवानांचा वापर करण्यात आला असल्याने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

भाजप लोकसभा निवडणुकीत वेळोवेळी आचारसंहिता भंग करत असल्याचे आरोप करत विरोधकांनी टीका सुरू केली आहे. दुसरीकडे निवडणुका जाहीर होताच ‘नमो टीव्ही’ चॅनेल सर्वत्र दाखवले जात आहे. आचारसंहिता लागू असून सुद्धा सर्रासपणे यावर मोदींचे भाषण व भाजपचा प्रचार केला जात आहे. यावर विरोधकांनी प्रश्न उपस्थित केल्याने निवडणूक आयोगाने याप्रकरणी सूचना प्रसारण मंत्रालयला नोटीस बजावली आहे.

Leave a Comment