पाकिस्तानी नागरिक तब्बल 50 वर्षांनंतर होणार भारताचा नागरिक

citizens
मुंबई – मुंबई उच्च न्यायालयात गेली अनेक वर्षे भारतीय नागरिकत्व मिळावे यासाठी कायदेशीर लढा देणाऱ्या पाकिस्तानी नागरिक आसिफ काराडीया यांना लवकरच आता भारतीय नागरिकत्व बहाल करण्यात येणार असल्याचे मुंबई उच्च न्यायालयात केंद्रीय गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

आसिफ काराडीया यांचे वंशज हे भारतीय होते. पण काराडीया यांचे कुटुंब फाळणीनंतर पाकिस्तानात स्थलांतरित झाले होते. पण काही वर्षातच आसिफ काराडीया यांनी पुन्हा भारतात येऊन मुंबईत राहण्यास सुरवात केली होती. पत्नी, तीन मुले असे आसिफ यांचे कुटुंब आहे. पण आसिफ काराडीया यांना प्रदीर्घ व्हिसाची मुदत संपल्यानंतर देश सोडण्याचे आदेश देण्यात आले होते.

मुंबई उच्च न्यायालयात २०१६ साली आसिफ यांनी धाव घेतली. आपण गेली ५० वर्षे भारतात राहत असून भारतीय नागरीकत्वासाठी अर्ज करूनही त्यावर कुठलाही निर्णय होत नसल्याचे त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते. यावर मुंबई उच्च न्यायालयाने केंद्रीय गृह मंत्रालयाला यावर प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले. यावर उत्तर देताना केंद्रीय गृह मंत्रालयाने येत्या १० दिवसात आसिफ काराडीया यांना भारतीय नागरिकत्व देण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.

Leave a Comment