टोपी आणि शिट्टी देतो, मग करा देशाची चौकीदारी – अकबरुद्दीन ओवेसी

Akbaruddin-Owaisi
नवी दिल्ली – आता राजकीय वातावरण लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातील वक्तव्यांमुळे तापण्यास सुरूवात झाली असून एकमेकांवर विविध राजकीय पक्षांचे नेते आरोप-प्रत्यारोपांची राळ उडवताना दिसत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आता एमआयएम पक्षाचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी टीका केली आहे. नरेंद्र मोदी नक्की कोण आहेत? कधी ते आपल्याला चहावाला असल्याचे सांगतात तर कधी आपल्या समोर दुसऱ्या रुपात येतात. आता तर निवडणुकी आधी ते चक्क चौकीदार बनले आहेत. टोपी आणि शिट्टी आता त्यांना आणून देतो, मग खुशाल त्यांनी चौकीदारी करावी, असे ओवेसी यांनी जाहीर सभेत म्हटले आहे.

ओवेसी पुढे म्हणाले, त्यांनी चहावाला बनून देशाची दिशाभूल केली. आता पुन्हा तेच काम ते चौकीदार बनून करत आहेत. मोदी जेव्हा चहावाला झाले. त्यावेळी मी म्हटले होते की, चहाची किटली, चुल मी देईन, चहा त्यांनी बनवून आम्हाला द्यावा. मोदी असे व्यक्ती आहेत, जे कधी नाल्यातील गॅसवर पकोडे बनवतात. आता ते चौकीदार झाले आहेत. मी त्यांना टोपी आणि शिट्टी देईन. मोदींनी टोपी आणि गळ्यात शिट्टी बांधून देशाची चौकीदारी करावी.

Leave a Comment