सत्ताधाऱ्यांनी मतदार यादीतून वगळली महाराष्ट्रातील ४० लाख दलित आणि मुस्लीमांची नावे

BG-Kolse-patil
मुंबई – मतदार यादी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अद्यावत केली जात असून सत्ताधाऱ्यांना दलित आणि मुस्लीम मतदार मते देत नसल्याने सुमारे ४० लाख मतदारांची नावे त्यांनी गाळल्याचा आरोप माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी केला आहे.

जनता दलाच्या कार्यालयात बी. जी. कोळसे पाटील यांनी एक पत्रकार परिषद आयोजित केली होती. काही दिवसांवर लोकसभा निवडणूक येऊन ठेपली आहे. पण, देशभरातून १२ कोटी तर राज्यातून ४० लाखांच्या वर मतदारांची नावे गायब झाल्याचे समोर आले आहे. मुस्लीम आणि दलित मतदारांची नावे यात गायब असल्यामुळे यामागे नक्कीच भारतीय जनता पक्ष असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे.

सय्यद खालिद सैफुला यांनी ही नावे नेमकी कशी गहाळ झाली ? यासंबंधीचा सविस्तर अहवाल केला आहे. त्यांनी यासाठी मिसिंग अॅपची निर्मिती केली आहे. निवडणूक आयोगाकडे याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे. याची आयोगाने दखल घेऊन मतदार याद्या अद्यावत कराव्यात, असे आवाहन कोळसे पाटील यांनी केले आहे. निवडणूक आयोगाला त्यासाठी पत्र दिले असल्याचे कोळसे पाटील यांनी सांगितले. आंध्र प्रदेशमध्ये आजही शनिवार-रविवार मतदार यादी अद्यावत करायचे काम सुरू आहे. महाराष्ट्रातील निवडणूक आयोगानेही मतदारांच्या याद्या अद्यायावत कराव्यात, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

Leave a Comment