सॅम पित्रोदा यांचे हवाई दलाच्या एरियल स्ट्राईकबाबत वादग्रस्त वक्तव्य

sam-pitroda
नवी दिल्ली : काँग्रेसचे ओव्हरसीज अध्यक्ष आणि गांधी परिवाराचे निकटवर्तीय सॅम पित्रोदा यांनी पुलवामासारखे हल्ले भारतात होतातच, त्यामुळे संपूर्ण देशाला जबाबदार धरत पाकिस्तानवर एरियल स्ट्राईक करणे चुकीचे असल्याचे मत व्यक्त केले आहे.

भारतात येऊन काही जण हल्ले करतात, तुम्ही त्यासाठी संपूर्ण पाकिस्तानला दोषी ठरवणार का? असा सवाल विचारत पित्रोदांनी पाकिस्तानची बाजू मांडली आहे. पित्रोदांच्या या वक्तव्यामुळे मोठा वाद होणार, असे दिसत आहे. पित्रोदा म्हणाले की मुंबईवर 26/11 चा हल्ला झाला. आम्हीदेखील (काँग्रेस) त्यावेळी विमाने पाठवू शकत होतो. पण हे चुकीचे आहे. अशाप्रकारे तुम्ही वागू शकत नसल्याचे म्हणत पित्रोदांनी अप्रत्यक्षपणे एरियल स्ट्राईकवर टीका केली आहे. ए

पित्रोदा म्हणाले की, हल्ल्याविषयी मला फार माहीती नाही. पण असे हल्ले होतच असतात. असा हल्ला मुंबईवरदेखील झाला होता. आम्हीदेखील (तत्कालीन काँग्रेस सरकार)त्यावेळी विमाने पाठवू शकलो असतो. पण ते योग्य नाही. तुम्ही असे वागू शकत नसल्याचे म्हटणत पित्रोदांनी पुलवामा हल्ला आणि भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमध्ये घुसून केलेल्या एरियल स्ट्राईकबाबत मत व्यक्त केले आहे. दरम्यान पित्रोदांच्या या वक्तव्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला लक्ष्य केले आहे. मोदींनी म्हटले आहे की, पुन्हा एकदा भारतीय जवानांचा विरोधकांनी अपमान केला आहे. या लोकांना सर्व भारतीयांनी प्रश्न विचारायला हवेत.

Leave a Comment