अर्जुन तेंडुलकरचा होणार लिलाव, पण कशासाठी?

arjun-tendulkar
मुंबई – सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनने मुंबई टी-२० लीगच्या लिलावासाठी आपल्या नावाची नोंदणी केली असून आयपीएल संपल्यानंतर ही स्पर्धा खेळवण्यात येण्याची शक्यता आहे.

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने मुंबई टी-२० लीग ही स्पर्धा खेळवली जात असून ६ संघांचा यामध्ये समावेश असतो. यापूर्वी अर्जूनने विनू मांकड अंडर १९, कूँचबिहार करंडक, अंडर-१९ केसी महिंद्रा शील्ड आणि डी. वाय. पाटील टी-२० स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. अर्जूनची या जोरावर अष्टपैलू खेळाडू म्हणून बीसीसीआयच्या वनडे लीगसाठी मुंबईच्या अंडर-२३ संघातही निवड करण्यात आली होती. अर्जुनने श्रीलंकेविरुद्ध भारताच्या अंडर -१९ संघात पदार्पण केले होते.

Leave a Comment