यामुळे प्रकाश आंबडेकरांनी उमेदवारांच्या नावापुढे केला जातीचा उल्लेख

prakash-ambedkar
मुंबई – काल वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील आपल्या 37 उमेदवारांची यादी जाहीर केली. पण या यादीतील सर्वच उमेदवारांच्या नावापुढे त्यांच्या जातीचा उल्लेख करण्यात आला होता. यावरुन प्रकाश आंबेडकरांना प्रश्न विचारण्यात येऊ लागले. आंबडेकरांनी त्यावर खुलासा करत आंबेडकर यांनी निरनिराळ्या समाजातील लोकांना उमेदवारीची संधी देण्यात आल्याचे म्हटले. ही नवी पद्धत असून राजकारणाची दिशा याने बदलेल, असा विश्वास आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे.

काल लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील ३७ उमेदवारांची पहिली यादी वंचित बहुजन आघाडीने जाहीर केली आहे. अ‍ॅड. प्रकाश आंबडेकर यांनी उमेदवारांची नावे घोषित करताना त्यांच्या नावापुढे कंसात समाजाचा उल्लेख करून आणखी एक डाव खेळला. वंचित बहुजन आघाडी अ‍ॅड. आंबेडकर यांचा भारिप बहुजन महासंघ आणि असदुद्दीन ओवेसी यांचा एमआयएम पक्ष मिळून उभी केली आहे. वंजारी, बौद्ध, धिवर, माना आदिवासी, माळी, बंजारा, धनगर, मुस्लिम, कैकाडी, मातंग, शिंपी, कोळी, विश्वकर्मा, वडार, होलार, कुणबी, लिंगायत, भिल्ल, वारली, मराठा, आगरी अशा बहुतांश समांजांना आघाडीकडून प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. यात सात डॉक्टर, तीन प्राध्यापक व दोन वकिलांचा समावेश आहे.

आंबेडकर उमेदवारांच्या जातीबद्दल बोलताना म्हणाले की, आम्ही आज जात जाहीर केली. कारण ही प्रणाली कोणताही पक्ष स्वीकारत नाही. मराठ्यांव्यतिरिक्त शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षात कुणालाच उमेदवारी दिली जायची नाही. हीच पद्धत पुढे घराणेशाहीत बदलली आहे. आमचे असे आहे की एकदा निवडणूक आम्ही जिंकलो की पुढे ते फक्त एक राजकीय कार्यकर्ता म्हणूनच काम करतील. आम्ही त्यांना आज फक्त कार्यकर्ता म्हणूनच तिकिट दिले आहे. ही जातीअंताच्या लढाईचीच सुरुवात असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.

Leave a Comment