जे आमच्या मनात आहे तेच राज ठाकरेंनी ओठावर आणले – जितेंद्र आव्हाड

jitendra-awahad
पुणे – मुंबईतील एका कार्यक्रमात राज ठाकरे यांच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जहरी टीका केली. हल्ली बारामतीतून राज ठाकरे यांच्या भाषणाची स्क्रिप्ट येते. ते भाषणाची सुपारी घेतात. त्यांच्या भाषणामुळे विचलित होऊ नका, असे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले होते. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

राज ठाकरे यांनी मनसेच्या १३ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता. त्यानंतर त्यांच्या कालच्या भाषणामुळे राज ठाकरेंना पोपट म्हणणारे, सुपारी घेऊन बोलतात असा आरोप करणारे विचलित झाले आहेत. राज ठाकरेंनी जे आमच्या मनात आहे तेच ओठावर आणले, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले, की मुख्यमंत्री बारामतीचा पोपट असे म्हणताना हे विसरले की, २०१४ च्या निवडणुकीत राज ठाकरेंनी सक्षमपणे नरेंद्र मोदींची पाठराखण केली होती. त्यांचा दृष्टीने तेव्हा पोपट असलेले कुठे होते? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मोदी स्वतः शरद पवारांची करंगळी धरून राजकारणात आलो आहे, असे सांगतात. त्यामुळे पोपट, करंगळी धरणे यासारखी विधाने पवारांच्या दृष्टीने काही नवीन नाहीत. राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात प्रत्येकाला आधार म्हणून शरद पवारांचे नाव घ्यावे लागते. देवेंद्र फडणवीस यांनी हे आज पुन्हा सिद्ध केले, असेही त्यांनी म्हटले आहे.

Leave a Comment