मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची संख्या सांगून भाजप करत आहे राजकारण

prakash-ambedkar
पनवेल – पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय हवाई दलाने केलेल्या एरियल स्ट्राईकमध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांचा आकडा भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी जाहिर केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी भाजपवर टीका करताना, हे भाजप सरकार एरियल स्ट्राईकमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांचा आकडा जाहिर करुन जुमलेबाजी करत असल्याचे म्हटले आहे.

नुकतीच वंचित बहुजन आघाडीची सत्ता परिवर्तन महासभा पनवेलमध्ये पार पडली. अमित शहा यांना कोणी हल्ल्यात किती दहशतवादी मेले हे विचारले होते का? असा प्रश्न विचारत आंबेडकर यांनी प्रतिहल्ला चढवला. २५० दहशतवादी मारले गेल्याचा दावा अमित शहा यांनी केला होता. आंतरराष्ट्रीय माध्यमांनी मोठी जीवितहानी झाली नसल्याचे सांगून भाजपच्या दाव्याची चिरफाड केल्याचे भारिप नेते प्रकाश आंबेडकर म्हणाले. हल्ल्यानंतर ठिकठिकाणी पाकिस्तानचे झेंडे जाळण्यात आले. एवढे पाकिस्तानी झेंडे येतात कुठून, अगोदरच झेंडे प्रिंट केले होते का? हे सगळे आधीच ठरले होते का? असा खोचक सवाल देखील आंबेडकर यांनी विचारला.

Leave a Comment