देशासाठी मोठे योगदान देणाऱ्या काही महिला गुप्तहेर

detective
काही महिन्यांपूर्वीच आपण आलिया भट्टला राजी या चित्रपटात गुप्तहेराचे काम करताना पाहिले होते. तिच्या या चित्रपटातील भूमिकेसाठी खुप कौतूक देखील झाले. पण त्यावेळी तुमच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला असेल की भारतासाठी कोणत्या महिला गुप्तहेराने काम केले आहे का. पण हे खरे आहे, देशासाठी महिला गुप्तहेरांचेही मोठे योगदान आहे. वेळप्रसंगी त्या आपल्या जीवाची बाजी देखील लावतात. अशाच काही महिला गुप्तहेरांबाबत आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत.
detective1
नूर इनायत खान – फ्रान्समध्ये ब्रिटनतर्फे जर्मनी आणि हिटलरच्या विरोधात भारतीय वंशाच्या ब्रिटिश गुप्तहेर नूर इनायत खान यांनी हेरगिरी केली होती. फ्रान्स आणि ब्रिटनमध्ये इनायत खान यांचा परिवार राहात होता. नूर यांचे फ्रेंच भाषेवर प्रभुत्व होते. फ्रेंच रेडिओमध्ये नूर काम करायच्या. त्यांनी 1943साली जर्मनी आणि हिटलर यांची हेरगिरी केली होती. त्यांनी दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान फ्रान्समध्ये नर्स म्हणून काम केले. नाझींनी त्यांच्यासोबत आलेल्या तमाम फ्रेंच गुप्तहेरांना ठार मारले. 10 महिने नूर यांना मरणयातना दिल्या गेल्या. पण त्यांच्याकडून कुठलेच रहस्य बाहेर आले नाही. टिपू सुलतानच्या वंशाच्या नूर यांच्या मरणानंतर फ्रान्सने त्यांना जॉर्ज क्रॉस या उच्च सन्मानाने सन्मानित देखील केले.
detective2
सेहमत खान – सेहमत खान या एका काश्मिरी व्यावसायिकाची कन्या होत्या. त्यांना पाकिस्तानात गुप्तहेर म्हणून पाठवले होते. त्यांचे त्यासाठी एका पाकिस्तानी लष्कर अधिकाऱ्याशी लग्न करून दिले होते. त्यांच्यावरच आधारित राजी चित्रपट आला होता. निकाहानंतर सहमत यांनी पाकिस्तानी सेनेची गुप्त माहिती भारताला दिली. त्या भारतात परत आल्या तेव्हा गरोदर होत्या. त्यांचा मुलगा लष्करात होता. त्यांच्या आयुष्यावर कॉलिंग सहमत ही कादंबरी हरिंदर सिक्का यांनी लिहिली होती.
detective3
सरस्वती राजामणी – म्यानमारमध्ये जन्मलेल्या सरस्वती राजामणी यांनी त्यावेळी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला होता. सुभाषचंद्र बोस यांच्या नॅशनल आर्मीत त्या दाखल झाल्या. त्यांनी इंग्रजांच्या कँपमध्ये पुरुषांच्या वेषात राहून माहिती पुरवली. राजामणी स्वातंत्र्यानंतर तामिळनाडून सरकारी घरात रहात असत.
detective4
माधुरी गुप्ता – इस्लामाबादमध्ये भारतीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या माधुरी गुप्ता यांच्यावर पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप होता. त्यांना 22 एप्रिल 2010साली भूतानमधील सार्क संमेलनाच्या तयारीसाठी बोलावले होते. त्यांना दिल्ली विमानतळावर इंटेलिजन्स ब्युरोने पोलिसांकडे सोपवले. राजद्रोहाचा आरोप माधुरी गुप्तांवर होता. त्या आयएसआय अधिकारी जमशेदच्या संपर्कात होत्या आणि संवेदनशील माहिती द्यायच्या.

Leave a Comment