पत्नीला सोडून दिलेल्या ४५ अनिवासी दादल्यांचे पासपोर्ट रद्द

maneka-gandhi
नवी दिल्ली : भारत सरकारने पत्नीला सोडून दिलेल्या ४५ अनिवासी भारतीयांचे (एनआरआय) पासपार्ट रद्द केले असल्याची माहिती असे महिला व बाल विकासमंत्री मनेका गांधी यांनी दिली आहे.

अनिवासी भारतीयांच्या लग्नांतील फरार पतींना अनिवासी भारतीयांच्या विवाहांवर लक्ष देण्यासाठी करण्यात आलेली इंटेग्रेटेड नोडल एजन्सी लुकआऊट परिपत्रक जारी करीत असून त्यानुसार या ४५ अनिवासी भारतीयांचे पासपोर्ट परराष्ट्र मंत्रालयाकडून रद्द करण्यात आले असल्याचे मनेका गांधी म्हटले आहे.

नोडल एजन्सीची एक बैठक नुकतीच महिला व बाल विकास मंत्रालयातील सचिव राकेश श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. मनेका गांधी म्हणाल्या की, सरकारने राज्यसभेत अनिवासी भारतीयांनी सोडून दिलेल्या पत्नींना न्याय मिळण्यासाठी विधेयक मांडले होते. पण हे विधेयक वरिष्ठ सभागृहात अडवून ठेवण्यात आले आहे.

Leave a Comment