समाजवादी पक्षाचा नेता बरळला; म्हणे पाकिस्तानवरील हल्ला खोटा

vinod-kumar
लखनौ – भारतीय हवाई दलाने पुलवामा येथील भ्याड दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून पाकिस्तानच्या हद्दीत घुसून केलेल्या बॉम्बहल्ल्याच्या कारवाईचे कौतुक सर्वच स्तरांतून होत असतानाच उत्तर प्रदेशचे माजी मंत्री आणि समाजवादी पक्षाचे नेते विनोद कुमार उर्फ पंडित सिंह यांनी या कारवाईवर शंका उपस्थित केली आहे. पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या तळावर केलेला हवाई हल्ला हा खोटा असून, असे काही तेथे घडलेच नसल्याचे विनोद कुमार म्हणाले आहेत.

पाकव्याप्त काश्मिरमधील दहशतवाद्यांच्या तळावर केलेली कारवाई खोटी असून भाजप नेते सपशेल खोटे बोलत आहेत. हल्ला होणार हे १० दिवसांपासून माहीत होते. भारत आणि पाकिस्तानमध्ये १० दिवसांआधीच हातमिळवणी झाली होती आणि एखाद्या पडक्या घरात एक-दोन बाँब टाकण्याचा निर्णय झाला होता असा आरोप कुमार यांनी उत्तर प्रदेशच्या गोंदा येथे पक्ष कार्यकर्त्यांच्या एका कार्यक्रमात केला आहे.

Leave a Comment