आमच्या देशाकडे वाकड्या नजरेने पाहाल तर याद राखा

kangna-ranvat
जम्मू-काश्मिरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी रोजी सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय हवाई दलाच्या मिराज 2000 अशा अत्यंत घातक लढाऊ विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून ‘जैश-ए-मोहम्मद’च्या दहशतवादी तळांवर जोरदार हल्ला चढवला. त्यानंतर भारतीय हवाई दलाच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. या कारवाईचे कलाविश्वातुनही स्वागत केले जात आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतीय हवाई दलाचे अनेक कलाकारांनी अभिनंदन केले आहे. याचदरम्यान बॉलीवूडची क्वीन म्हणजेच अभिनेत्री कंगना राणावत हिने देखील हवाई दलाचे कौतुक करत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत.

भारतीय हवाई दलाचे कौतुक करत कंगनाने म्हटले, की भारतीय हवाई दलाला माझा सलाम. हा निर्णय तातडीने घेतल्याबद्दल मी पंतप्रधान मोदींची आभारी आहे. यापुढे जोही आमच्या देशाकडे वाकड्या नजरेने पाहिल त्याचे डोळे फोडण्यात येतील, अशा शब्दात तिने आपल्या भावना व्यक्त केल्या. कंगनाच नव्हे, तर सलमान खान, अक्षय कुमार यांनीही सोशल मीडियावर हवाई दलाचे कौतुक केले आहे.

Leave a Comment