हवाईदलाच्या एरियल स्ट्राईकनंतर सुरक्षा यंत्रणेकडून देशात हायअलर्ट जारी

high-alert
मुंबई – मंगळवारी पाकव्याप्त काश्मिरातील दहशतवाद्याच्या तळावर भारतीय हवाईदलाकडून एरियल स्ट्राईक करण्यात आला. पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर जैशकडून करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्याचे प्रतिउत्तर हा हल्ला असल्याचे सांगण्यात येत आहे. सुरक्षा यंत्रणेकडून या पार्श्वभूमीवर देशात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

शाळा, कॉलेज, रेल्वे स्टेशन, एअर पोर्ट, बसस्थानक परिसरात महाराष्ट्र राज्य सरकारकडून सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. संबंधित अधिकाऱ्यांना त्यासंदर्भातील दक्षतेच्या सुचना देण्यात आल्या आहे. पुढील काही काळ अत्यंत महत्त्वाचा असून सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. हवाई दलाच्या एरियल स्ट्राईकनंतर पाककडून हल्ला केल्या जाण्याची शक्यता आहे. शिवाय काश्मीर खोऱ्यात इतर काही दहशतवादी आहेत जे कोणत्याही हल्ल्यासाठी सज्ज असू शकतात. हा हाय अलर्ट या पार्श्वभूमीवर देण्यात आला आहे.

रेल्वे स्थानकांसोबच विमानतळांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. विमानतळांवर टर्मिनल बिल्डिंग, एयरसाइड, सर्व प्रकारचे परिचालन क्षेत्र आणि विमानात प्रवेश करताना कडक तपास तसेच पार्किंग क्षेत्रामध्ये तपास करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच प्रवासी, कर्मचारी यांचा कसून तपास करण्यात येत आहे. मालवाहक, कार्गो टर्मिनल इत्यादी विभागाची कडक चौकशी केली जात आहे. दरम्यान, हवाई दलाने सर्व हवाई सुरक्षा तळांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत. पाकिस्तानकडून हल्ला झाल्यास नियंत्रण रेषेवर सर्व हवाई तळे तयार असायला हवी, यासाठी हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Leave a Comment