रावळपिंडीमधील सुरक्षित ठिकाणी मसूद अजहरला पाकिस्तानने हलवले

masood-azhar
नवी दिल्ली : जम्मू-काश्मिरमधील पुलवामा येथे झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानला चोहोबाजूने घेण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्या भ्याड हल्ल्याची जबाबदारी मसूद अजहरच्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने स्वीकारली.

मसूद अजहर गेल्या काही वर्षांपासून भारताविरुद्ध गरळ ओकण्यात आणि पाकिस्तानमधील तरुणांची माथी भडकाविण्याचे काम करीत आहे. भारत त्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र चीनकडून याला विरोध होत आहे. मसूद अजहरला पाकिस्तानही पाठीशी घालतना दिसत आहे.

याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानने ‘जैश ए मोहम्मद’ चा म्होरक्या मसूद अजहरला बहावलपूर हेडक्वार्टरमधून हटवून दुसऱ्या ठिकाणी पाठवले आहे. मसूद अजहरला रावळपिंडीमधील सुरक्षित ठिकाणी पाकिस्तान सरकारने हलवल्याचे सांगण्यात येत आहे. या ठिकाणी पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयचे मुख्यालय आहेत.

मसूद अजहरला 1994 साली भारताने पोर्तुगालच्या खोट्या पासपोर्टवर प्रवास केल्याने अटक केली होती. त्याआधी 17 वर्षांआधी 1999 मध्ये कंधार विमान अपहरणावेळी त्याला सोडावे लागले होते. मसूद अजहरला आयएसआयची मदत मिळत असल्याचा दावा भारतातर्फे अनेकदा केला गेला आहे.

Leave a Comment