स्वतःची बायोपिक बनवणार कंगना राणावत

kangna-ranawat
बॉलीवूडची क्वीन अशी ओळख असलेल्या कंगना राणावत काही दिवसांपूर्वी आपल्या मणिकर्णिका या चित्रपटामुळे प्रसिद्धीच्याझोतात होती. त्यानंतर रंगलेले मानापमान तर आपल्या चांगलेच माहिती आहे. त्याबद्दल आपल्या नव्याने सांगायची गरज नाही. त्यानंतर आता वातावरण निवळले आहे.

त्यातच आता तिने आपल्या संघर्षमय जीवनावर आधारित चित्रपट बनवणार असल्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर तिने याबाबत माहिती देताना सांगितले की माझी कथा एका परीकथेप्रमाणे असून त्यात खूप चढउतार असून माझ्यासाठी हा खुप मोठा अनुभव आहे. त्याचबरोबर माझा अविश्वसनीय संघर्षमय प्रवास तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी मी खूप उत्साही आहे.

या बायोपिकबाबत एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार या बायोपिकची कथा ‘बाहुबली’ आणि ‘मणिकर्णिका’सारख्या चित्रपटांची कथा लिहिणारे के.वी. विजयेंद्र प्रसाद यांची असेल. या बायोपिकच्या चित्रीकरणाला या वर्षाच्या अखेरीस सुरुवात होईल. मनाली जवळच्या एका छोट्या गावातून येऊन कंगनाने बॉलिवूडमध्ये आपली एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. कंगना सध्या ‘मेंटल है क्या’ आणि ‘पंगा’ या चित्रपटात काम करीत आहे.

Leave a Comment