तुमच्या खात्यात मोदी सरकारने 15 लाख कधीच जमा केले – व्ही. के. सिंह

VK-singh
पुणे – नरेंद्र मोदी यांनी 2014च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान सत्तेत आल्यास देशातील प्रत्येक नागरिकाच्या बँक खात्यात 15 लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर आजमितीस कोणत्याही नागरिकाच्या खात्यात 15 लाख सोडा एक दमडी देखील जमा झाली नाही. पण आता याबाबत केंद्रीय राज्यमंत्री व्ही. के सिंह यांनी विचारले असता त्यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे.

ज्यावेळी 15 लाख रुपये नागरिकांच्या खात्यात जमा करण्याची घोषण करण्यात आली त्यावेळी त्यांना तुम्ही विचारले का असा प्रश्न केल्यानंतर त्यांनी देशात भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर देशातील जनतेला जीवनवश्यक वस्तूंचा पुरवठा कधीही कमी पडू दिला नाही आणि भाव देखील स्थिर ठेवले. जर त्याचा हिशोब केला तर ती रक्कम 15 लाखांपेक्षा जास्त होईल असे म्हटले आहे.

पुण्यात आज व्ही. के. सिंह यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यांना या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी देशातील जनतेच्या बँक खात्यात 15 रुपये कधी जमा होणार असा प्रश्न विचारला असता त्याला उत्तर देताना सिंह म्हणाले, देशात मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर सर्व सामान्य नागरिकांना जीवनवश्यक वस्तूचा पुरवठा कमी पडू दिला नाही आणि भाव देखील स्थिर ठेवले. या सर्वांची तुलना केल्यास हा आकडा १५ लाखांपेक्षा जास्तच असल्याचा दावा त्यांनी केला.

यावेळी भारत-पाकिस्तान संबंधांसंदर्भातही भूमिका सिंह यांनी स्पष्ट केली. भारताचे अमेरिका, रशिया, सौदी अरेबिया या सर्व देशांसोबत चांगले संबंध आहे. नरेंद्र मोदींनी सत्तेत येताच पाकिस्तानशी संबंध सुधारण्यासाठी पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांशी फोनवरून चर्चा देखील केली. कोणताही तोडगा त्यावेळी निघाला नसून सीमेवरील तणाव आणि गोळीबार बंद होत नाही. तोवर पाकिस्तान सोबत चर्चा होणार नाही, असे त्यांनी पाकला सुनावले.

Leave a Comment