अशोक चव्हाण यांचे विधान चुकीचे असून राज्यातील सरकार कार्यकाळ पूर्ण करेल

devendra-fadanvis
मुंबई – प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी विधानसभेचे अधिवेशन २८ फेब्रुवारी रोजी संपताच मुख्यमंत्री विधानसभा बरखास्त करतील आणि लोकसभेसोबतच विधानसभेच्या निवडणुकादेखील घेतल्या जातील असे म्हटले होते. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चव्हाण यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यात विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका एकत्र होणार असल्याचे वक्तव्य विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकत असल्याने केले जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच अशोक चव्हाण यांचे विधान चुकीचे असून राज्यातील सरकार कार्यकाळ पूर्ण करेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा बरखास्त होणार नसल्याचे म्हटले आहे.

लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्रित घेण्याची तयारी सुरू आहे. २८ फेब्रुवारी रोजी विधानसभेचे अधिवेशन संपताच मुख्यमंत्री विधानसभा बरखास्त करतील आणि लोकसभेसोबतच विधानसभेच्या निवडणुकादेखील घेतल्या जातील, त्यादृष्टीने कामाला लागा. मतांचे विभाजन टाळा आणि भाजप-सेनेला पाडा, असे कळकळीचे आवाहन औरंगाबादमध्ये अशोक चव्हाण यांनी केले होते. तसेच चव्हाण यांनी यावेळी केंद्र व राज्य सरकारवर चौफेर टीका देखील केली होती.

Leave a Comment