विश्वचषकात बुमराह भारताचा हुकमी ‘एक्का’ – सचिन तेंडुलकर

jaspreet-bumrah
मुंबई – सध्या क्रिकेटच्या सर्वच प्रकारात विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया चमकदार कामगिरी करत असल्यामुळे २०१९ विश्वचषक स्पर्धेचा भारताचा संघ प्रबळ दावेदार असल्याचे मत माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर याने व्यक्त केले.

आता काही महिनेच विश्वचषकाला उरले आहेत. सचिनला त्या पार्श्वभूमीवर प्रश्न विचारण्यात आला, की या विश्वचषक स्पर्धेत भारतासाठी कोणता खेळाडू निर्णायक ठरेल? सचिनने त्यावर उत्तर देताना जसप्रीत बुमराह हा भारतासाठी निर्णायक कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त केला.

जसप्रीत बुमराह आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतो. या संघातील तो प्रमुख खेळाडू असल्यामुळे त्याचा खेळ मी जवळून पाहिला असून तो आपल्या वेगवान माऱ्याने या विश्वचषक स्पर्धेत विरोधी संघासाठी घातक ठरेल, असेही सचिन म्हणाला. २०१८ या वर्षामध्ये बुमराहने उत्कृष्ट कामगिरी करून भारताचा अव्वल दर्जाचा गोलंदाज म्हणून आपली क्रिकेट विश्वात ओळख बनवली आहे.

Leave a Comment