मुस्लिमांपेक्षा हिंदू जास्त राहतात पाकिस्तानातील ‘या’ गावात

pakistan
नेहमीच पाकिस्तानात अल्पसंख्याकांवर झालेल्या अत्याचाराच्या बातम्या आपण वाचत असतो. पण पाकिस्तानात असे एक गाव आहे तिथून अशा प्रकारच्या बातम्या येत नाहीत. मिठी असे पाकिस्तानातील या गावाचे नाव आहे. थारपारक जिल्ह्यातील हे गाव लाहोरपासून 879 किमी. अंतरावर तर कराचीपासून 278 किमी दूर आहे. मिठी भारताच्या अहमदाबादहून 341 किमी दूर आहे. येथे वाळवंट आहे. मिठीला 1990मध्ये थारपारकर जिल्ह्याचा भाग बनवले होते. 80 टक्के हिंदू मिठीमध्ये राहतात. पाकिस्तान बनले तेव्हापासून येथे हिंदू आणि मुस्लीम एकोप्याने राहत आहेत.
pakistan1
डॉनच्या रिपोर्टनुसार एका फेलोशिपसाठी पत्रकार अमेरिकेला गेला होता. त्याला तिथे सिंधचा व्यक्ती भेटला. त्याने सांगितले, सिंधमध्ये राहणारा मी हिंदू आहे. आम्ही आमचे अख्ख आयुष्य मुस्लिमांसोबत काढले आहे. रमजानमध्ये आम्ही रोजा पाळतो. मोहरमला हिंदू मुले मिरवणुकीत असतात. 20 तासाचा प्रवास करून पत्रकार मिठीमध्ये पोचला, त्याला तेव्हा आलेला अनुभव पाकिस्तानात कुठेच येत नसल्याचे तो म्हणाला. नावाप्रमाणे मिठी गोड आहे. येथे मुस्लीम गाय कापत नाहीत तर हिंदू मोहरममध्ये लग्न करत नाहीत.
pakistan2
रमजानमध्ये हिंदू मुस्लिमांना जेवण देतात. ईद आणि दिवाळीत एकमेकांना मिठाई देतात. येथे गुन्हेही फार घडत नाहीत. मिठीमध्ये विकासाची भरपूर कामे होतात. अनेक जिल्ह्यातील लोक मिठीमध्ये येतात. येथील जमिनीत 175 बिलियन टन कोळसा आहे. जगभरातील हे 5वे सर्वात जास्त कोळशाचे भांडार असलेले गाव आहे.
pakistan3
या गावातल्या एका मुस्लीम व्यक्तीने सांगितले की हिंदू देवळात पूजा करतात, तेव्हा नमाजचा लाऊडस्पीकर कमी आवाजात असतो. तर रमजानमध्ये कोणी खुलेआम जेवणावळी घालत नाहीत. नमाजच्या वेळी मंदिरातल्या घंटा वाजवल्या जात नाहीत. गावात सगळे जण होळी खेळतात. सिंधच्या सरकारने एप्रिल 2014साली मिठीमध्ये विद्यापीठ आणि कॉलेज बनवण्याची घोषणा केलेली. येथे सरकारी आणि खाजगी हॉस्पिटल्स आहेत.

Leave a Comment