काँग्रेस आणि भाजप एकाच माळेचे मणी – मायावती

mayawati
नवी दिल्ली – शेतकरी कर्जमाफीचा फॉर्म्युला मध्य प्रदेश आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत हिट ठरल्यानंतर गरिबांना काँग्रेसने साद घातली. एक ऐतिहासिक निर्णय काँग्रेस पक्षाने घेतला. लोकसभा निवडणूक जिंकल्यास सत्ता स्थापनेनंतर लगेचच देशातील प्रत्येकाला किमान उत्पन्नाची हमी दिली जाईल, असे आश्वासन राहुल गांधी यांनी छत्तीसगडमधील जाहीर सभेत दिले आहे. पण बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी राहुल गांधींच्या किमान उत्पन्नाच्या हमीवरुन निशाणा साधला आहे. तसेच भाजप आणि काँग्रेस दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात अपयशी ठरल्याने हे पक्ष एकाच माळेचे मणी असल्याचे मायावती यांनी म्हटले आहे.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी घोषणा केलेल्या किमान उत्पन्नाच्या हमीची ‘गरिबी हटाव’ घोषणेशी मायावती यांनी तुलना केली आहे. राहुल गांधींनी दिलेले हे आश्वासन इंदिरा गांधी यांनी 1971 मध्ये दिलेल्या ‘गरिबी हटाव’ घोषणेप्रमाणेच हे एक आश्वासन असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अशी आश्वासने देण्याआधी राहुल गांधींनी काँग्रेसची सत्ता असणाऱ्या मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करावी, असेही मायावती यांनी म्हटले आहे.

Leave a Comment