मोदींचे जनतेला ३० जानेवारीला शहिदांना आदरांजली वाहण्याचे आवाहन

narendra-modi
नवी दिल्ली – काल ५२ व्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी यांनी जनतेशी संवाद साधला. त्यांनी यावेळी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनाविषयी माहिती दिली. तर गांधीजींच्या पुण्यतिथीनिमित्त ३० जानेवारीला देशवासीयांनी २ मिनिटे मौन बाळगून शहिदांना आदरांजली अर्पण करण्याचेही आवाहन यावेळी केले.

पंतप्रधान मोदी मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून शासनाच्या नवीन योजनांची माहिती देत असतात. त्यांनी यावेळी सुभाष चंद्र बोस यांच्या देशप्रमाच्या कार्याला उजाळा दिला. त्यांनी यावेळी दिल्ली येथील बोस यांच्या संग्रहालयाबद्दलही माहिती सांगितली. मोदी सरकारचा हे संग्रहालय बनवण्यात मोठा हातभार लागला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तर, त्यांनी जनतेसमोर बोस यांच्या जीवनाशी संबंधित अज्ञात कागदपत्राचांही उलगडाही केला. तसेच रवींद्रनाथ टागोर यांच्या कार्याविषयीही त्यांनी माहिती यावेळी दिली.

रेडिओच्या माध्यमातूनही देशाच्या स्वातंत्र्य चळवळीचे कार्य नेताजींनी केले. आपण त्यावरुनच मन की बात कार्यक्रम करण्यास प्रोत्साहित झालो, असा खुलासाही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केला. तर, अंतराळ क्षेत्रातही भारत सामर्थ्य वाढत आहे. यासाठी विद्यार्थ्यांचा सहभाग महत्वाचा असल्याचे सांगत अंतराळ संशोधन क्षेत्रावरही प्रकाश टाकला. कलामसॅट हा उपग्रह विद्यार्थ्यांनी तयार केला म्हणून त्यांनी त्या विद्यार्थ्यांचे कौतुकही केले.

त्यांनी कार्यक्रमाच्या शेवटी ‘सुंदर शौचालय’ या स्पर्धेची माहिती देत शौचालय सजवणाऱ्या नागरिकांचे त्यांनी यावेळी अभिनंदन केले. महात्मा गांधींची ३० जानेवारीला पुण्यतिथी आहे. देशातील शहिदांना त्यानिमित्ताने श्रद्धांजली वाहण्याचे आवाहन मोदी यांनी यावेळी केले. आपण आहात त्या जागी राहून २ मिनीटे मौन पाळून शहिदांना आदरांजली वाहण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Leave a Comment