करणची ‘कॉफी’ थंड करणार निर्माते ?

karan-johar
कॉफी विथ करण शो क्रिकेटर हार्दिक पंड्याने केलेल्या वादग्रस्त विधानामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. हा शो गेली अनेक वर्षे प्रेक्षकांची पसंत मिळवत आला. पण शोला हार्दिक पंड्या प्रकरणामुळे मिळालेली वाईट पब्लिसिटी शो कायमचा बंद व्हायला भाग पाडू शकते.

अनेक सेलेब्रिटी कॉफी विथ करणच्या सहाव्या पर्वात येऊन गेले. शोची लोकप्रियतादेखील चांगली आहे. या शोमध्ये अलिकडेच क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि के. एल. राहुल आले होते. त्यांनी या शोमध्ये महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करुन वाद ओढवून घेतल्यामुळे बीसीसीआयची नाराजी त्यांना सहन करावी लागली आहे.

महिलांबद्दल दोघांनी केलेल्या घाणेरड्या कॉमेंटसची गंभीर दखल बीसीसीआयने घेतली. त्यांना भारत आणि ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिकेतून काढून टकण्यात आले आहे. इतकेच नाही तर अनेक कंपन्यांनी त्यांच्यावर बंदी आणली आहे. बीसीसीआयने त्यांना क्रिकेटच्या सर्व फॉर्मॅमध्ये खेळण्यावर बंदी घातली आहे.

शोचे निर्माते कॉफी विथ करण हा शो पुढे सुरू ठेवायचा की, बंद करायचा यावर विचार करीत असल्याचे एका आघाडीच्या वृत्तपत्राने म्हटले आहे. सुरुवातीपासूनच कॉफी विथ करण हा अनेक वादांना जन्म घालणारा शो ठरला आहे. परंतु अलिकडे आलेल्या अनेक नकारात्मक बातम्यांमुळे यावेळी शो गंभीर अडचणीत आला आहे. हा शो बंद होणार का याबद्दलची खात्रीलायक बातमी नाही. तथापि, हा शो बंद करण्याचा विचार निर्माते करु लागले आहेत. शोच्या चाहत्यांसाठी ही धक्कादायक गोष्ट ठरु शकते.

Leave a Comment