सध्या देशाला भेडसावत असलेल्या विविध समस्यांचा राज ठाकरेंच्या व्यंगचित्रात उल्लेख

raj-thakre
मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज जर काही लोकमान्य टिळक असते तर ते गोपाळ गणेश आगरकरांना म्हणाले असते, की आजची परिस्थिती पाहता मला तुमचं म्हणणं पटतंय; प्रथम समाज सुधारणा हव्यात मग स्वातंत्र्य! असा मथितार्थ असलेले व्यंगचित्र काढले आहे. राज यांनी टेंबू, कराड येथे आगरकरांच्या पुतळ्याची विटंबना झाली या घटनेचा उल्लेख करत सदर व्यंगचित्र काढले असून सध्या देशाला भेडसावत असलेल्या विविध समस्यांचा उल्लेख त्यांनी या व्यंगचित्रात केला आहे.
raj-thakre1
राज यांनी आपल्या व्यंगचित्राच्या माध्यमातून बँकांना लुटून फरार झालेले उद्योगपती, महिलांवरील वाढते अत्याचार, शिक्षणाचा खालावलेला दर्जा, धार्मिक तसेच जातीय संघर्ष, बेरोजगारी असे विविध भीषण प्रश्न पार्श्वभूमीवर दाखवत आज लोकमान्य टिळकांनी असते तर समाजसुधारक आगरकरांच्या भूमिकेचे एका शतकानंतर समर्थन केले असते असे सुचवले आहे. लोकमान्य टिळक व गोपाळ गणेश आगरकर हे समकालिन दिग्गज होते, पण टिळकांची स्वातंत्र्य आधी अशी मागणी होती तर आगरकरांचा समाजसुधारणांना अग्रक्रम द्यावा असा आग्रह होता.

Leave a Comment