घाणेरड्या राजकारणाचा वीट आला आहे मला – एकनाथ खडसे

eknath-khadse
मुंबई : झी 24 तासला या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखती दरम्यान भाजप ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी घाणेरड्या राजकारणाचा मला वीट आला आहे म्हणून लोकसभा निवडणूक मी लढवणार नसल्याचे धक्कादायक वक्तव्य केले. परिस्थितीला मी दोष देत नाही, कदाचित माझेही काहीतरी चुकले असेल. पण आपल्यामागे शनीची साडेसाती लागली असल्याचे सांगत शनी कोण आहे याबद्दल माहिती असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. मी मधल्या कालखंडामध्ये अनुभवले त्यावरुन राजकारणाची मला घृणा वाटू लागली आहे. पण अशा घाणेरड्या राजकारणाचा मला वीट आल्याचेही ते म्हणाले. त्याचबरोबर विधानसभा लढवण्याबाबत अजून ठरवले नसल्याचे सांगत सत्ताधाऱ्यांमध्ये दु:ख केवळ माझ्याच वाट्याला आल्याचे दु:खही त्यांनी व्यक्त केले.

सध्या आमचे लक्ष महाराष्ट्रात भाजपला लोकसभेत जास्तीत जास्त जागा येतील याकडे आहे. मी लोकसभेसाठी इच्छुक नाही. जो निर्णय पक्ष घेईल तो मान्य करेल. विधानसभा जवळ आल्यावर त्या लढवायच्या की नाही हा विचार त्यावेळी घेईन असेही ते म्हणाले. 40 वर्षे ज्या व्यक्तीने भाजपच्या वाढीसाठी प्रयत्न केला. असे असताना त्याच्यावर बिनबुडाचे आरोप करण्यात आले. त्यात कोणतेही तथ्य नव्हते. असा प्रसंग कोणावर येऊ नये. हे मला क्लेशदायक वाटते. मला जो मनस्ताप सहन करावा लागला ती म्हणजे शनीची साडेसाती असल्याचे मला वाटते. तो शनी कोण आहे हे देखील मला माहित असल्याचे सूचक वक्तव्य त्यांनी यावेळी केले.

Leave a Comment