करणच्या ‘कॉफी’ दरम्यान हार्दिक, राहुलने केलेली विधाने भोवली

BCCI
टीम इंडियाचा संघ ऑस्ट्रेलियाला त्यांच्यात भूमीत पराभूत केल्याने वाहवा मिळवत आहे. पण सध्या वेगळ्याच कारणांमुळे कसोटी संघात पुनरागमन केलेला हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल हे चर्चेत आहेत. या दोघांनी करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये मुलाखत दिली. काही आक्षेपार्ह विधाने त्यात त्यांनी केली असल्याचे दिसून आले. आता यावरून बीसीसीआयने या दोघांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

महिलांविषयी हार्दिक पांड्याने केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे त्याच्यावर प्रचंड टीका झाली. तसेच लोकेश राहुलने केलेली काही विधानेही बीसीसीआयला खटकल्यामुळे या शो दरम्यान या दोघांनी केलेल्या वक्तव्याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असल्याचे बीसीसीआयच्या सीओएचे प्रमुख विनोद राय यांनी वृत्तसंस्थेला सांगितले. दरम्यान, हार्दिकने सोशल मीडियावर टिकेचा होणारा भडीमार पाहता आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सर्वांची माफी मागत, महिला वर्गाचा अनादर करण्याचा आपला कोणताही हेतू नसल्याचे म्हटले आहे.

Leave a Comment