स्वातंत्र्यानंतर भारताला लाभलेले सर्वात वाईट पंतप्रधान म्हणजे नरेंद्र मोदी

amrinder-singh
अमृत्तसर – भारताला स्वातंत्र्यानंतर जे पंतप्रधान लाभले त्यांच्यातील नरेंद्र मोदी हे सर्वात वाईट पंतप्रधान असल्याची टीका पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी केली आहे. कर्जमाफी, 1984 दंगल आणि इतर मुद्द्यांवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसला टार्गेट केल्यानंतर अमरिंदर सिंह यांनी हे वक्तव्य केले आहे.

नरेंद्र मोदींना अमरिंदर सिंह यांनी आव्हान दिले आहे की, आपण गेल्या पाच वर्षांत दिलेल्या आश्वासनांपैकी पूर्ण करण्यात आलेले एक तरी आश्वासन सांगावे. गुरुदासपूर येथे मोदींनी घेतलेल्या प्रचारसभेचा उल्लेख करताना ते म्हणाले की, नरेंद्र मोदी यांनी जुमले मारत तसेच धोका देत आणि मनाच्या गोष्टी सांगत देशाची पातळी खालावली आहे. आपले भले व्हावे असे वाटत असल्यानेच लोकाही त्यांना सत्तेवरुन हटवण्याच्या तयारीत आहेत.

कोणत्या तोंडाने नरेंद्र मोदी निवडून द्या सांगत लोकांना सामोरे जाणार आहेत, असाच प्रत्येकजण विचार करत असल्याचे अमरिंदर सिंह यांनी म्हटले आहे. त्यांनी यावेळी नरेंद्र मोदी सर्वात वाईट पंतप्रधान असल्याचे म्हटलं. नरेंद्र मोदींनी गुरुदासपूर येथील प्रचारसभेत बोलताना म्हटले होते की, काँग्रेसने देशातील इतर राज्यांप्रमाणे पंजाबमध्येही कर्जमाफीची घोषणा केली होती. पण दीड वर्षांनी काय परिस्थिती आहे सर्वांनाच माहित आहे. भूतकाळात काँग्रेसने अशा लोकांचे कर्ज माफ केले होते जे शेतकरीच नव्हते. काँग्रेसने गरिबी हटवण्याच्या नावे अनेक दशके देशाला लुटले आणि आता कर्जमाफीच्या नावे तेच करत आहेत.

Leave a Comment