भय्यूजी महाराजांच्या मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी करा – आठवले

ramdas-aathvale
नवी दिल्ली – भय्यूजी महाराज यांच्या मृत्युवर केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. सीबीआय मार्फत भय्यूजी महाराजांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आठवले यांनी केली आहे.

भय्यूजी महाराजांच्या मृत्युवर शंका उपस्थित करत आठवले यांनी म्हटले आहे, की भय्यूजींनी आत्महत्या केली नसल्यामुळे सीबीआय मार्फत या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी. भय्यूजींनी २०१८मध्ये गोळी झाडून आत्महत्या केली होती. इंदोरमधील आपल्या स्प्रिंग टाऊनशिप येथील निवासस्थानी आध्यात्मिक गुरू भय्यूजी महाराजांनी गोळी झाडून आत्महत्या केली होती. यानंतर त्यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. यानंतर रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले होते. याप्रकरणी आठवले यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांना पत्र लिहून त्यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. हे प्रकरण केंद्राकडे पाठवून याप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करा, असे आठवले यांनी पत्रात म्हटले आहे.

Leave a Comment