तीर्थक्षेत्राचा दर्जा भीमा-कोरेगावला द्यावा – रामदास आठवले

ramdas-aathwale
पुणे : राज्य सरकारने ६३ कोटी रुपयांचा विकास आराखडा कोरेगाव-भीमा येथील ऐतिहासिक स्तंभ परिसराच्या विकासासाठी तयार केला असून शंभर कोटी रुपयांचा आराखडा त्यात वाढ करून करण्यात यावा आणि तीर्थक्षेत्राचा दर्जा विजयस्तंभ परिसराला द्यावा, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपाइंचे (आठवले गट) राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली.

आठवले कोरेगाव-भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन केल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते. विजयस्तंभ परिसराला तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यासाठी केंद्र सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न करू. मागील वर्षीच्या कटू आठवणी विसरून यंदा सामाजिक सलोखा दिसून आला. असाच सामाजिक सलोखा यापुढेही कायम ठेवावा, असे आवाहन त्यांनी या वेळी केले. दरम्यान, पेरणे फाटा येथे पक्षाच्या वतीने आयोजित सभेला वाहतूककोंडीमुळे आठवले यांना वेळेत पोहोचता आले नाही.

Leave a Comment