एक ही गोळी न झडता मुंबईचा डॉन झालेल्या हाजी मस्तानची कहाणी

haji-mastan
अनेक माफिया डॉन मायानगरी मुंबईमध्ये उदयास आले. पण मुंबई अंडरवर्ल्डला एका नावाने एक नवीन ओळख दिली आणि ग्लॅमरला अंडरवर्ल्डसोबत जोडले. माफिया तस्कर हाजी अली मस्तान ते नाव आहे. मुंबईचा पहिला डॉन देखील मस्तानला म्हटले जाते.

26 मार्ज 1926 रोजी तमिळनाडूच्या कुड्डलोर येथे हाजी मस्तान मिर्झाचा जन्म झाला होता. त्याचे वडील हैदर मिर्झा एक गरीब शेतकरी होते. त्यांची आर्थिक परिस्थितीत खूपच बिकट होती. घरामध्ये अनेकवेळा खाण्यासाठी पैसे देखील नव्हते. त्यांना घर चालवणे फार जिकरीचे झाले होते. अशा हालाकिच्या परिस्थितीमुळे हैदर मिर्झाची शहरात जाण्याची इच्छा होती. पण परिस्थितीमुळे घर सोडून जाण्याची इच्छा होत नव्हती.

त्याच्या घराची परिस्थिती एवढी हलाखीची झाली की घरामध्ये दोन दिवस अन्नाचा कण शिजला नव्हता. अखेर हैदर मिर्झाने या परिस्थितीला कंटाळून बाहेर जाऊन पैसे कमविण्याचा निश्चय केला आणि त्यांना 1934 मध्ये आपल्या मुलाला सोबत घेऊन मुंबई गाठली. त्यांनी येथे अनेक कामे केली पण त्यात यश मिळत नव्हते. त्यानंतर त्यांनी क्रॉफर्ड मार्केटमध्ये सायकल दुरुस्तीचे दुकान सुरू केले. बराच काळ लोटूनही दुकानातून विशेष काही कमाई होत नव्हती. दरम्यान दुकानावर रिकामा बसलेला मस्तान रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या मोठमोठ्या गाड्या आणि आलिशान इमारतींकडे पाहत असे. येथून त्याला आपल्याकडे पण गाड्या आणि बंगले असावे असे स्वप्न रंगवले होते.

मुंबईत येऊन मिर्झा परिवाराला 10 वर्ष झाले होते. पण त्यांच्या परिस्थितीत काही बदल झाला नव्हता. मुंबईच्या गालिब शेख सोबत याचदरम्यान मस्तानची ओळख झाली. एका चतुर मुलाची आवश्यकता गालिबला देखील होती. मस्तानला त्याने सांगितले की, डॉकवर त्याने जर कुलीचे काम केले तर त्याच्या कपडे आणि पिशवीमध्ये तो काही विशेष सामान लपवून आरामात बाहेर आणू शकतो. त्याला या मोबदल्यात पैसे देखील मिळतील. मस्तानने यानंतर 1944 मध्ये डॉकवर कुली म्हणून काम करण्यास सुरुवात केली. तेथे तो मन लावून काम करत होता. मस्तानने कामादरम्यान डॉकवर काम करणाऱ्या लोकांसोबत मैत्री करण्यास सुरुवात केली.

लोक चाळीसच्या दशकात विदेशातून इलेक्ट्रॉनिक सामान, महागडी घड्याळे, सोने, चांदी किंवा दागिने घेऊन येत होते. या सामानावर त्यांना कराच्या रूपात मोठी रक्कम द्यावी लागत होती. यामुळे डॉकवर तस्करी करणे फायद्याचे होते. गालिबची ही गोष्ट मस्तानच्या लक्षात आली होती. आपल्या हातून मस्तानने ही संधी सोडली नाही आणि गुपचुपपणे त्याने तस्करांची मदत करण्यास सुरुवात केली. कुली असल्यामुळे त्याच्यावर कोणाला संशय येत नव्हता. मस्तानला या कामासाठी चांगली किंमत मिळत होती.

मस्तानचे आयुष्य डॉकवर काम करताना सुधारण्यास सुरुवात झाली होती. त्याला तस्करांची मदत केल्यामुळे चांगलाच फायदा होत होता. मस्तान मिर्झासाठी 1950 दशक एक मैलाचा दगड ठरले होते. दमन आणि गुजरातचा कुख्यात तस्कर सुकुर नारायण बखिया 1956 मध्ये मस्तानच्या संपर्कात आला. दोघांमध्ये मैत्री झाली आणि दोघांनी सोबत काम करण्यास सुरुवात केली. सोन्याची बिस्कीटे, फिलिप्सचे ट्रांझिस्टर आणि ब्रँडेड घड्याळ्यांची त्याकाळी खूप मागणी होती. पण अशाप्रकारचे सामान भारतात टॅक्समुळे आणणे परवडण्यासारखे नव्हते. त्यानंतर दुबई आणि येडन येथून दोघेही सामानाची तस्करी करू लागले. दोघांनाही या तस्करीमधून चांगला नफा मिळत होता. दोघांचे काम हळूहळू वाढत गेले आणि आता मस्तानचे आयुष्य पहिल्यापेक्षा फार बदलले होते. एक साधारण कुलीचे काम करणारा मस्तान आता बाहुबली माफिया मस्तान भाई बनला होता.

मुंबई अंडरवर्ल्डमध्ये सुरुवातीला वरदराजन मुदलियार ऊर्फ वर्धा भाई याची दहशत होती. पण माफिया डॉनची प्रतिमा त्याला निर्माण करता आली नाही. तो काही काळानंतर चेन्नईला माघारी फिरला. मुंबई अंडरवर्ल्डमध्ये तो गेल्यानंतर फक्त मस्तान भाई म्हणजेच हाजी मस्तान हे नाव होते. मस्तानने 1970 चे दशक येईपर्यंत मुंबईवर आपली वेगळी जागा निर्माण केली होती. फक्त दहा वर्षात मस्तानने मुंबईमध्ये आपले वर्चस्व निर्माण केले होते. फक्त मस्तानचेच शासन मुंबईच्या समुद्रावर चालत होते. जे स्वप्न मस्तानने पाहिले होते, त्यापेक्षा कितीतरी मोठी झेप त्याने घेतली होती. आता तो श्रीमंत आणि सामर्थ्यवान बनला होता. पांढऱ्या रंगाचा सूट परिधान करण्याचा आणि मर्सिडीज गाडीतून फिरण्याचा त्याला खूप छंद होता.

बॉलीवूडचे मुंबईच्या या अंडरवर्ल्ड डॉनला खूपच आकर्षण होते. बॉलीवूड अभिनेत्री मधुबालाचा हाजी मस्तान प्रचंड चाहता असल्याचे मुंबईतील जुने लोक सांगतात. तिच्यासोबत त्याला लग्न करायचे होते. पण परिस्थितीमुळे हे शक्य झाले नाही. त्याने त्यानंतर मधुबाला सारख्या दिसणाऱ्या सोना या फिल्म अभिनेत्रीसोबत विवाह केला. सोनाच्या अनेक चित्रपटांना मस्तानने फायनान्स केले होते. पण तिचे चित्रपट फ्लॉप गेले. हाजी मस्तानचे दिलीप कुमार, अमिताभ बच्चन, राज कपूर, धर्मेंद्र, फिरोज खान आणि संजीव कुमार सारखे दिग्गज बॉलीवूड अभिनेते मित्र होते असे सांगितले जाते. अनेक बॉलीवूडमधील अनेक दिग्गज त्याच्या बंगल्यावर दिसत होते.

मुंबईमध्ये हाजी मस्तानने आपले वर्चस्व असे प्रस्थापित केले की, पोलिस आणि कायद्याला तो झुगारत नव्हता. त्याला पोलिसांनी 1974 मध्ये अटक केली असता, व्हीआयपी सारखी सुविधा त्याच्यासाठी दिली होती. त्याला तुरूंगात न टाकता एका बंगल्यामध्ये नजरकैद करून ठेवण्यात आले होते. त्याला पोलिस सलाम करत होते. कारण पोलिसांची देखील मस्तान मदत करत होता. त्यांना महागड्या भेटवस्तू देणे त्याची सवय होती. पण जर एखादा अधिकारी त्याचे म्हणणे ऐकत नसेल तर तो त्याची बदली करत होता.

मस्तानविषयी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना माहिती मिळत होती. इंदिरा गांधींना मस्तानच्या वाढत्या प्रभावाचा त्रास होत होता. पोलिसांनी मस्तान मिर्झाला इंदिरा गांधीच्या आदेशावरून अटक करण्याचा प्रयत्न केला पण त्यांना अपयश आले. पण आणीबाणीच्या लागू केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. त्याची तुरूंगात जाण्याची ही पहिलीच वेळ होती. तो 18 महिने तुरूंगात राहिला होता. त्याच्या आयुष्याला येथून नवीन कलाटणी मिळणार होती. त्याची आणि जेपी यांची तेथे भेट झाली. जेपीच्या संपर्कात आल्यानंतर मस्तानवर त्याचा विशेष प्रभाव पडला. तुरूंगातून बाहेर पडल्यानंतर मस्तानचे हेतू बदलले होते. त्याने गुन्हेगारी विश्वाला रामराम ठोकण्याचा निश्चय केला.

हाजी मस्तानने आणीबाणीत तुरूंगात गेल्यानंतर काही दिवसातच तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना आपल्या सुटकेसाठी मोठी रक्कम देण्याची ऑफर केली होती. पण ही ऑफर इंदिराजींनी लाथाडून लावली. जनता पार्टी आणीबाणीनंतर सत्तेत आल्यानंतर मस्तानसह जवळपास 40 कुख्यात तस्करांना सोडून देण्यात आले. कारण आणीबाणी लागू होण्यापूर्वी मस्तानने अनेक मोठ्या नेत्यांना पोलिसांपासून वाचण्यासाठी आणि पळून जाण्यासाठी मदत केली होती. यामुळे जनता पार्टी सरकारने मस्तानची मदत केली होती.

अखेर 1980 मध्ये गुन्हेगारी विश्वाला मस्तानने रामराम ठोकला आणि राजकारणाकडे आपले मन वळविले. महाराष्ट्राचे दलित नेते जोगिन्दर कावडे यांच्यासोबत मिळून 1984 मध्ये दलित-मुस्लिम सुरक्षा महासंघ पक्षाची सुरुवात केली. भारतीय अल्पसंख्यक महासंघ असे नामकरण 1990 मध्ये पार्टीचे करण्यात आले. या राजकीय पक्षाचा बॉलीवूड सुपरस्टाप दिलीप कुमार यांनी भरपूर प्रचार केला. त्यांची पक्षाच्या अनेक कार्यक्रमांमध्ये उपस्थिती दर्शविली होती. पक्षाला राजकारणात यश मिळाले नसले तरी निवडणुकीमध्ये काळ्यापैशाचा मोठ्या प्रमाणात वापर झाला असल्याचे सांगितले जाते. येथूनच निवडणुकीमध्ये मोठ्याप्रमाणीत पैसा वापरण्याच्या प्रथेला सुरुवात झाली.

मुंबई अंडरवर्ल्डचा सर्वांत मोठा ताकदवर डॉन हाजी मस्तान होता. पण आपल्या संपुर्ण आयुष्यात या डॉनने कोणाचाही जीव घेतला नाही. कोणावरही त्याने हल्ला केला नाही. एवढेच नाही तर त्याने एक सुद्धा गोळी चालविली नाही. असे असूनही मस्तान या गुन्हेगारी विश्वातील मोठे नाव होते. त्याकाळी त्याचे नाव फक्त मुंबईतच नाही तर संपुर्ण महाराष्ट्रात होते. आयुष्यभर मुंबईच्या अंडरवर्ल्ड डॉनने मुंबईच्या लोकांची मदत केली होती. त्याने आपल्या जीवनाचा शेवटचा काळ आपली पत्नी आणि दत्तक घेतलेल्या मुलासोबत व्यतित केला. 1994 साली हृदयविकाराच्या झटक्याने हाजी मस्तानचा मृत्यू झाला. मुंबईत आजही त्याच्या नावाचे किस्से ऐकायला मिळतात.

Leave a Comment