रवि शास्त्री यांचा टीकाकारांवर जोरदार हल्ला

ravi-shastri
मेलबर्न – भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱया कसोटी सामन्यात १४६ धावांनी पराभव पत्करावा लागल्यानंतर भारतीय संघावर, संघनिवडीवर आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यावर टीका करण्यात येत आहे. रवि शास्त्री यांनी त्याला प्रत्युत्तर देताना टीकाकारांवर जोरदार हल्ला चढवला.

शास्त्रींनी टीकाकारांना लाखो मैलांवर बसून बोलणे किंवा टिका करणे सोपे असते. त्याला आमची काहीच हरकत नाही. मात्र, टीका करणारे हे खूप दूर भारतात असून आम्ही येथे ऑस्ट्रेलियात आहोत याचे भान ठेवावे, असा टोलाही लगावला आहे. जे योग्य भारतीय संघासाठी असेल ते करण्याचा आमचा प्रयत्न असेल आणि त्याच्यावर आम्ही काम करत असल्याचे शास्त्री यावेळी म्हणाले. शास्त्री संघनिवडीवर बोलताना म्हणाले की, जे काही चित्र खेळाडूंच्या निवडीवर तज्ज्ञांनी निर्माण केले आहे, ते पूर्णपणे चुकीचे आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना २६ डिसेंबरपासून मेलबर्न येथे खेळवण्यात येणार आहे. दोन्ही संघांनी मालिकेत १-१ सामना जिंकून बरोबरी साधली आहे.

Leave a Comment