दुसऱ्या कसोटीत कांगारूंसमोर विराटसेनेची शरणगती

team-india
पर्थ – ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या कसोटी सामन्यात विराट सेनेचा १४६ धावांनी दारूण पराभव केला आहे. २४३ धावांवर ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव आटोपल्यानंतर विजयासाठी भारताला २८६ धावांची गरज होती. पण भारताचा पूर्ण संघ या आव्हानाचा पाठलाग करताना १४० धावांमध्ये गारद झाला.

या सामन्यात भारतीय फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या माऱ्यासमोर सपशेल शरणागती पत्कारली. मिचेल स्टार्क आणि नॅथन लॉयन यांनी प्रत्येकी ३ गडी घेत विजयाचा पाया रचला. तर जोश हेजलवुड आणि पॅट कमिन्स यांनी २-२ गडी बाद केले. ऑस्ट्रेलियाने या विजयासह मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे.

या सामन्यात शानदार कामगिरी करणाऱ्या लॉयनला सामनाविराचा पुरस्‍कार मिळाला. त्याने दोन्ही डावात ८ गडी गारद करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. सामन्याच्या अखेरच्या दिवशी ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ५ विकेटची आवश्यकता होती. ऑस्ट्रेलियाने पाचव्या दिवशी पंधरा षटकांमध्येच भारताच्या ५ फलंदाजांना माघारी धाडत पर्थ कसोटीत १४६ धावांनी दणदणीत विजय साजरा केला.

Leave a Comment