‘उजनी’चे पाणी प्यायल्याने कॅन्सरची शक्यता!

ujani-dam
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणातील पाण्याचा सोलापूर विद्यापीठानं शास्त्रशुध्द अभ्यास केला असून या चाचणीत पारा, शिस आणि अनेक रासायनिक घटक आढळून आल्यामुळे सतत उजनी धरणातील पाणी पिल्याने कॅन्सर होण्याची शक्यता असल्याचा निष्कर्ष विद्यापीठातील संशोधकांनी काढला आहे. यामुळे चार जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्याविषयी मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.

सोलापूरसह, उस्मानाबाद, पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यातील काही तालुक्यांना उजनी धरणातून पाणीपुरवठा केला जातो. या धरणातून सोलापूर, पंढरपूर, बार्शी, सांगोला, मंगळवेढा, अक्कलकोट, कुर्डुवाडी, करमाळा आणि उस्मानाबाद या शहरांसह ४००हून अधिक गावांना पाण्याचा पुरवठा केला जातो. पण माणसे आणि जनावरांनाही पिण्यायोग्य हे पाणी नसल्याचा निष्कर्ष निघाल्याने खळबळ उडाली आहे.

Leave a Comment