‘हे’ बाबा २० वर्षांपासून केवळ ‘वाळू’ खाऊन जगत आहेत

sand
आंध्र प्रदेशातील कालसापडू, कडप्पा परिसरातील एक व्यक्ती मागील २० वर्षांपासून केवळ वाळू अन्न म्हणून खाऊन जगत असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. याकाळात त्याने एक दिवसही जेवण घेतलेले नाही. ते वाळूशिवाय १ कप चहा, कॉफी किंवा थंड पेय घेतात. या बाबाचे नाव नुक्कला शिव कोटेश्वर राव असे आहे.

इतर सामान्य भात किंवा जे अन्न पदार्थ खातात, ते पदार्थ आपण खाल्ले तर जगणार नाहीत. तसेच कोणतेही काम करणे किंवा साधे चालणेही त्यांना जमणार नाही. त्यांच्यासाठी वाळू हे चांगले अन्न आहे. त्यांना आतापर्यंत कोणतीही आरोग्य समस्या नसल्याचे या बाबांनी म्हटले आहे. बहुतेक वेळा पोथुलुरी वीरब्रह्मेन्द्र स्वामी मंदिर येथे त्यांचे वास्तव्य त्यांना असते. एखादी संस्था किंवा व्यक्तीने मदत किंवा दान केले तर ते तो पैसा गरिबांना देतात, असे तेथील लोकांनी सांगितले.

Leave a Comment