न्यायालयात टिकणार नाही मराठा आरक्षण – रामदास आठवले

ramdas-aathwale
रायगड – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत मराठा आरक्षण न्यायालयात टिकणार नाही. पण आरक्षण हे मराठा समाजाला मिळालेच पाहिजे. तसेच देशात मंदिर, पुतळे बांधले नाहीत तर मते मिळणार नाहीत. भाजपला भारिप व एमआयएम युती ही फायदेशीर असल्याचे स्पष्ट मत मांडले.

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले खोपोली येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) रायगड जिल्हा युवक कार्यकर्त्यांच्या वतीने घेण्यात आलेल्या मार्गदर्शन मेळाव्या निमित्त उपस्थित होते. त्यांनी यावेळी पत्रकारांशी संवाद साधला. मराठा आरक्षण, राम मंदिर, भारिप व एमआयएम आघाडी याबाबत रामदास आठवलेंनी आपले मत व्यक्त केले. आठवले यांना मराठा आरक्षण न्यायालयात टिकेल का? याबाबत विचारले असता, न्यायालयात आरक्षण टिकणार नाही. देशात ७५ टक्के आरक्षणाचा कायदा केल्यास आरक्षणाचा मुद्दा सुटणार आहे. आमचा मराठा आरक्षणाला पाठींबा आहे, असे उत्तर आठवले यांनी दिले.

आठवले यांना राम मंदिराबाबत विचारले असता, लाखो करोडो लोकांची राम मंदिर होणे ही इच्छा आहे व आमची देखील आहे. वादग्रस्त जागेचा निकाल लागेपर्यंत थांबणे गरजेचे आहे. पण मुस्लीम समाजावर राममंदिर बांधताना अन्याय होणार नाही याची काळजी घेणेही गरजेचे आहे. राम मंदिराची जागा ही पूर्वी बौद्ध धर्मियांची असून तेथे बुद्धविहार होते. सध्या वादग्रस्त जागा असल्याने त्या बदल्यात बौद्ध धर्मियांना दुसरीकडे जागा शासनाने द्यावी, अशी मागणी आठवले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आठवले यांनी मंदिर, पुतळे बांधून विकास होणार का? या प्रश्नावर मंदिर, पुतळे उभारले नाहीत तर मते मिळणार नाहीत, अशी मिश्किल प्रतिक्रिया दिली. भारीप व एमआयएम आघाडीबाबत विचारले असता, ही आघाडी भाजप आघाडीला फायदेशीर असल्याची प्रतिक्रिया दिली.

Leave a Comment